गुरुवार, १७ मार्च, २०१६

काही विचार करायला लावणारं ...

* काही विचार करायला लावणारं ....

1.  ती - काही खाणार का ?
     मी - इथ माणंसच माणंसाला खातात मग माणुस काय  खाइल ..
      असो..थोड पाणी मिळाल तर बर होईल.

2 . जिंदगीकी दुवा ना दे जालीम ...
      जिंदगी किसको रास आइ है...

3 . दुसर्याची दु:ख जाणुन घेण्यात एवढा का आनंद असतो ?

4 . जीवनात एखाद विसाव्याच ठिकाण दुदैवान जर भेटल नाही..
      तर माणुस दुसर्या ठिकाणाचा आधार घेऊण जगायला लागतो..

5 . अंतररंगाचा विचार करण्याची वाट ,बाह्यारुपावरुनच जाते..

6 . तहानलला जीव आणि तहान भागवणारा जीव यांना लांबुन पहाणारा एक जीव लागतो . पण तोही कसा पाहीजे ? त्याला तहाणेची आर्त समतली पाहीजे आणि ती भागवणाऱ्याची क्षमताही ओळखीची हवी ..

7 . शोधायला गेल्यावर तेच सापडेल जे हरवले होते . पण जे बदलले आहे . ते सापडणे जरा अवघडच ...i

8 . समाधान मानूण घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही आणि पुष्कळदा स्वतःला सुखी समजणारी माणसं ही केवळ सवईने सुखी झालेले असतात ....

९ . वेदनेत , दुःख: त आणि प्रायश्चित्तात आनंद आहे आणि त्याच्यामुळेच आयुष्याला अर्थ आहे ...

१० . ज्या गोष्टींवर माणसाच प्रचंड प्रेम असतं , तिचाच त्याच्याकडुन नाश होतो .
  फरक फक्त एवढाच आहे की ,
कोणी प्रेम देऊन मारतं तर कोणी व्देश करूण मारतं .

११ . आयुष्य हे कठीण आहे , सगळ्यांनाच ते जगण्यासाठी लढा द्यावा लागतो .
पण आव्हानांना संधी म्हणून स्वीकारणारे काहीच लोक असतात ..

१२ . वियोगाच दुःख सहनशक्तीच्या पलीकडचं असतं
    वाट पाहण्याच्या यातना तर जीवघेण्या असतात .

१३ . शारीरिक सोंदर्य हे फक्त प्रारंभापुरतं निमित्त ठरतं
   प्रवासभर सोबत होते ' ती विचारांचीच ..

१४. सुखाची आणि दुःखाची कारणं शोधण्यापेक्षा समोरच दुःख आणि सुख जसच्या तसं स्वीकारण हेच आधिक चांगलं .

१५. दुःख मुके असते , हेच खरे ! ते दृष्टीतुन किंवा स्पर्शातुन सांगता येते , पण शब्दांतुन काही प्रकट करता येत नाही ...

१६ . ज्या दुःखाचे स्वरूप अजुन माझे मलाच नीट कळलेले नाही . ते दुसऱ्याला तरी कसे समजाऊन सांगायचे ...

१७ . शब्द तेच असतात , फक्त त्यांची सांगड ( रचना ) कोण कुठल्या प्रकारे घालतो यावर सारा खेळ अवलंबुन असतो .

१८ . जास्त काय लिहिणार ?
       जे राहून गेलं , ते राहणारच होतं ,
     कारण , काय करायच ? हे ठावणारा मी नव्हतो .
   आजही जे करावस वाटतं आहे , ते तरी हातून कुठं  होतय ? म्हणूनच , ' जो तुझे मंजुर, वो हमें मंजुर '
म्हणत वेचारीक पातळीवर शांत आहे ...

शेवटी ...
- क्षण- क्षणाचे सोबती ....


९ टिप्पण्या:

  1. आपली टिप्पणी प्रविष्ट करा...masttt

    उत्तर द्याहटवा