शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५

आठवणींच्या जगात


( नोट - वाचकांनी कृपया नोंद घ्यावी..कीमाझे मराठी व्याकरण जरा जास्तच कच्चे असल्या कारणाने ..लिहण्यात काही चुका आढळळ्यास त्या नजर चुकीने टाळाव्यात ....सुधारणा चालु आहे...चुकांसाठी क्षमस्व.. )                                           


  ..... तर हे सारे लिहण्याचा हठ्ठाहास यासठी की १३ फेबृवारी ला असाच ऑफीस मधुन घरी आलो होतो...फ्रेश होऊन जरा बसलोच होतो की...आमच्या लाडक्या साली सायबा मिस   प्रतिमा यांचा msg आला ..
" काय जिजु ..ताई ला काय गिफ्ट घेतल वेलंटाईन डे निमित्त......."
तेव्हा मला कळल की उद्या वेलंटाईन डे आहे..
प्रेमाच प्रतिक असलेला दिवस ....
आणि याच दिवशी काही वर्षांपुर्वी  माझ्या मित्राच्या  आयुष्यात घडलेला हा किस्सा ....
या डे निमित्त तुमच्यासमोर मांडायला सुचल ...                                                                                                
आज दि.२८ फ़ेब्रुवारी २०१५
आज पासुन बरोबर मागे १४ दिवसांपुर्वी  म्हणजेच १४ फ़ेब्रुवारी ला  वेलंटाईन डॆ साजरा झाला ....खर तर हा लेख मी त्या दिवशीच लिहायला घेतला होता पण शब्दांची जुळवा-जुळव आणि आठवणींना ऊजाळा देता देता
आज हा लेख लिहुन झाला.

१४ फेबृवारी म्हंणजेच वेलंटाईन डे ..
पाश्चात्य संस्कृतिने परिधान केलेला हा पोषाख आता हळुहळु ( हळुहळु म्हनण्यापेक्षा जवळजवळ ) सगळ्याच  राष्ट्रांनी नी परीधाण केलेला दीसत आहे..
प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणुन हा दीवस ओळखला जातो...खर तर प्रेम व्यक्त करण्यासाठी वीशीष्ट असा  दिवसच असला पाहिजे का ?? ( मला नाही वाटत )
तर या दिवशी आपले प्रेम व्यक्त केले जाते भेले ते कोणत्याही नात्यातले का असेना.................
( नात्याला काही नाव नसावे .....असे आत्ताच मितवा सांगुन गेला )
असो....

माणसाच्या आयुष्यात दु:ख तर खूप असतात पण प्रत्येक जन हे दु:ख विसरून पुढचे आयुष्य जगत असतॊ  पण कधी कधी आयुष्यात असेही क्षण येतात ज्यावेळेस काही जुन्या आठवणी मनावर ताबा घेतात आणि तेव्हा नकळत त्या आठवणीत डोळे कधी भरून येतात तेच कळत नाही.. मग का कुणास ठाऊक पुन्हा त्याच क्षणांची त्याच दिवसांची हे मन पुन्हा मागणी करते.. खरच आयुष्यात जगलेले क्षण पुन्हा हवेच असतात पण ते शक्य नसते, पण मग तरीही का बरे हे मन  त्या क्षणांच्या मागे धावत असते.. ..
शेवटी आयुष्याचे गणित कोणाला उलगडले आहे तेव्हा मला उलगडेल.....

पौंगाडावस्थेत ज्यावेळी प्रेमाची अंकुरे फुटु लागतात ..त्यावेळीस आपल्याला जात-पात ,उच्च-निच्च ही कसलिच कुंपने माहीत नसतात ...त्याला फक्त एक अनामीक ओढ लागलेलि असते ...प्रेमाची

आपल पहिल प्रेम ...आपल्यालाच कळत नसत नेमक काय आहे हे ...तो उमलण्याचा काळच असा असतो . त्याला फक्त वाहण माहीत असत ..
ह्या वयात आल्यावर आजवर केवळ ऐकलेले किंवा आजुन त्या शब्दाचा स्पर्श ही न झालेला तरुन हे जेव्हा स्वता फील करु लागतो ..तेव्हा त्याला सार जग हे वेगळ भासु लागत ,छान वाटु लागत .......
पण भुतकाळात मागे डोकावताना असे काही क्षण असतात जे सर्वस्वी आनंदाई असतात जे पुन्हा पुन्हा आयुष्यात येऊशी वाटतात ....
पण आता ते काही येनार नाहीत कारण ते आता आठवणींच्या स्वरुपात मनाच्या डायरीत जमा ज़ालेले असतात....

थोड्या फार फरकाने आपल्या सगळ्यांच्याच  आयुष्यात अशाच काही कडु- गोड आठवणिंच वलय असत . सुखद , मनाचा अलगद ताबा घेनार ....आपण त्याच्या भोवतिच घुटमळत असतो...

अशीच माझ्या एका मित्राची सुखद आठवण,,,,,

शाळा...............
शाळा कोणाला नाही आवडत? आपल्या सगळ्यांनाच आवडते. कितीही मोठे झालो तरी शाळेतले दिवस विसरू शकत नाही..
आपण घडतो,शिकतो,सावरतो ते ईथेच.आयुष्यातले पहिले मित्र इथेच भेटतात.
( इथे भेटलेले मित्र हेच फ़क्त आपले खरे मित्र आणि सोबती असतात
नंतर भेटलेले मित्र मात्र  मि आणि ते ईतरत्र  असे होतात )
पहिले प्रेमही इथेच होते.
एवढेच न्हवे तर बऱ्याच काही गोष्टी आपल्याला या शाळाच शिकवते..
तर अशा या शाळॆत अशीच एक मुलगी होती....

सोनल ......
लाजरी..गुबरी..अवखळ..खेळकर..उनाड....
नाजुक बांधा त्यावर स्वच्छ पांढरा शर्ट आणि खाली नीळ्या रंगाचा स्कर्ट , छोटेसेस पण मुलायम केस आणि त्यावर तो लाल रंगाचा हेअर बन्ड, तेच सुंदर निरागस डोळॆ
आपल्याच विश्वात रमनारी ती...
तो......
तिच्याच सारखा...शेवटी तिचाच मित्र ना....
दोघांच वय जेमतेम सारखेच ,शेवटी एकाच वर्गात होते म्हटल्यावर वय हे सारख असनाराच
त्यांची ओळख झाली ती पाहिल्यांदा ५ वी.मध्येे असताना ...ओळख झाली म्हणण्यापेक्षा........( ह्या वयात ओळख होणे म्हंणजे काय , हे पण माहीत नसाव कदाचित ) 
तर हे दोघे ५ वी. त असल्यापासुनचे एकमेकांचे मित्र ..
एकत्र खेळणे , एकत्र अभ्यास करणे आणि एकमेकांशी भांडण करणे असा त्यांचा नित्यनियम ...
तसे त्याला मित्रही होतेच आता शाळेत असल्यावर पुर्ण वर्ग हा आपल्या ओळखीचा असतो...इथे सगळेच एकमेकंचे मित्र असतात
पण त्याची ति एक मैत्रिन , तो फक्त तिच्याषीच बोलायचा ..जास्त नाही पण जो काहो मुलिंसोबत संबंध येइल त्यात तो तिच्याशिच बोलत असे ....
असेच ५वी. ते ७वी. हे तिन वर्ष खेळता खेळता निघुन गेले
आता ते दोघे ८ वी.ला आले होते
मराठी शाळेमधुन न्यु इंग्लिश स्कुल मध्ये..
शाळा  बदालली वर्ग बदलला काही नविन मित्र आता जुन्या मित्रांमधे add झालेले ...
पण जसजस दिवस जाऊ लागले तस तसे त्याला काहीतरी वेगळेपण भासु लागले ...
वेगळ जे पहील कधी झालच नव्हत  .
शाळेतले पहिल्यासारखे दिवस आता राहिले नव्हते ..ते एक-मेकांची खोड करणे ,ति मस्ती ते बिंदास्त मुलींशि बोलण काही काही राहिल नव्हत ....
नक्की त्याला काय होतय हे त्याच त्यालाच कळत नव्हत ..
साप जशी  आपल्या आंगावरची जुनि कात काडुन नवीन कात धारण करतो तस काहीस त्याला जाणवत होत ..
तिच्याकडे पहताना सुद्धा त्याला एक प्रकारची भिति वाटत होती...
पण त्या पहाण्यात सुद्धा आता एक प्रकारच वेगळेपण आल होत ,
डोळ्यात आता एक वेगळीच नशा दिसत होती
तिच्याकडे पहताना नकळत गालावर खळी पडत होती ....
समोर टिचर शिकवत असताना आणि पुर्ण वर्गाच्या नकळत तिच्याकडे पहताना त्याला मिळनारा तिचा समिश्र प्रतिसाद सार काही सांगुन जात होता ...
ते दोघे आता त्यांच्याच विश्वात रमायला लागले होते ..त्यांच्या या जगात आता नावीन पालवी फुटु पहात होती.. त्या पालवीला आता नवनविन दररोज फुले फुलु पहात होती ..
त्यांच्या  या जगाला मात्र नाव काय होत हे त्यांच त्यांनाच माहीत नसाव,
एकमेकांना चोरुन पहाने...
नजरेतूनच हसने , नजरेतूनच रागवने  सारे सारे काही नजरेतूनच बोलायचे.. दुसऱ्यांना कळो किंवा न कळो पण त्याच्या  नजरेची भाषा तिला आणि तिच्या नजरेची भाषा त्याला  नक्कीच कळत होती ....
तिचा विचार केला तरी त्याला लाजल्यासारख व्हायच..सतत तिचाच विचार डोक्यात ..मनात सतत एक प्रकारचि हुरर्हुर ...त्याला तिच्याबद्दल एक वेगळीच ओढ लागलेली ...त्याला कळत नव्हत नेमक काय होत आहे ते..तो फक्त त्या प्रहावात वहात चालला होता ..
तो  कुठे वहात चालला होता ,त्याच त्यालाच  ठाऊक नव्हतं.. डोंगरावरुन सुरु झालेल्या पावसाच्या धारेला तरी कुठं माहीत असतं ते कुठे जाणार आहे ते.. ते नुसत वहावत जातं.. वसुंधरेच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने.. बेफाम होत, हिंदकळत, ठेचाळत… त्याचही तस्संच झालं होतं..
अशा या तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊण सुद्धा त्याला कळत नव्हत नेमक काय होत आहे हे...
कदचित हे समजण्याइतपत शहानपण आजुन तरी त्याच्यात आले नसावे...

पौंगंडावस्थेत ज्यावेळी प्रेमाची अंकुरे फुलु लागतात..त्यावेळीस आपल्याला जात-पात,उच्च -निच्च ही कसलीच कुंपणे माहीत नसतात ...आपल्याला फक्त एक अनामीक ओढ लागलेली असते ...प्रेमाची
आपल पहिल प्रेम ...आपल्यालाच कळत नसत नेमक काय आहे हे ...हा उमलण्याचा काळच असा असतो . आपल्याला फक्त वाहण माहीत असत ..
ह्या वयात आल्यावर आजवर केवळ ऐकलेले किंवा आजुण त्या शब्दाचा स्पर्श ही न झालेलो आपण  जेव्हा स्वता फील करु लागतो ..तेव्हा आपल्याला  सार जग हे वेगळ भासु लागत ,छान वाटु लागत ..........
असच ते वर्ष ते दिवस लपंडाव किंवा ऊन सावळीचा खेळ खेळता खेळता निघुन गेलं...

प्रेम.......
प्रेम मोकळ असत का? की खरच त्याला काही बंधन असतात.
वेळेच बंधन असत का त्याला?
रोज रोज दिसणारे ते चेहरे आणि त्याच्याबरोबर लहाणाचे मोठे झालेलो  आपण , अचानक एके दिवशी पोरके होतात , एकदम अचानक..........
अचानक रस्ते वेगळे होतात ,ध्येय वेगली होतात आणि मग प्रवास सुरु होतो ..... एकट्याचा
तसच काहीस याच्या बरोबर झाल ..
ध्येय प्राप्तीसाठी नविन जगात आपल पाउल उमटवण्यासाठी त्याणे दुसरीकड Admission घेतले....

प्रेमात काही गोष्टी कधीच विसरता येत नाही.. आणि जर सगळ्या गोष्टी माणूस विसरला तर ते प्रेम कसले.. प्रेमात जगलेला प्रत्येक क्षण हा एक वेगळा अनुभव देऊन जात असतो आणि जेव्हा हे प्रेम दूर जाते तेव्हा मात्र ते आठवणींची चादर पांघरायला देऊन जात असते.. मग नकळत या आठवणीत माणूस हरवून जातो आणि त्यानंतर अनुभवणारी प्रत्येक गोष्ट जणू त्यास ओळखीची वाटत असते.. त्या वाटा, तो पाऊस, तो समुद्र किनारा, आणि राना वनातून भटकताना पायाखाली दबलेल्या तो पाचोल्याचा आवाजही ओळखीचा वाटतो..
अशाच आठवणीत व  शिक्षणात पुढची ३ वर्ष गेली...

कॉलेज  १२ वी. च वर्ष
सळसळ्नार रक्त ,नविन स्वप्न ,नविन जग
कॉलेज म्हणजे धमाल, कॉलेज म्हणजे मस्ती, कॉलेज म्हणजे मैत्री आणि कॉलेज म्हणजे प्रेम.. कॉलेज म्हटले की अभ्यास कमी आणि या गोष्टी आल्याच पाहिजेत.. त्याशिवाय कॉलेजला आणि तरुणाईला अर्थच राहत नाही.. तुम्हीही ही धमाल मस्ती केलीच असेल.. शाळा सुटल्यावर नवीन मित्र, नवीन वर्ग, नवीन कॅन्टीन सगळे काही नवीन आणि यात बंधनही नाही कोणाचे.. आयुष्यात सगळ्यात आनंदाचे क्षण म्हणजेच कॉलेज अस
कॉलेज लाईफ़ तो एंज्वाय करत होता..मित्रांसोबत दंगा मस्ती, लेक्चर बंक करुन कुठेतरी मस्त फ़िरायला जाने..लेट नाईट घरी येणे हे आता नित्याचेच झाले होते..
अशा या धम्माल मस्ती मध्ये हे वर्ष ही संपत आले होते..
पहाता पहाता १२वी. चि बोर्डाची परीक्षा जवळ आली होती...

फ़ेब्रुवारी महीना असेल प्रक्टिकल्स चे दिवस होते..सकाळी प्रक्टिकल करायचे आणि कॉलेज बाहेर ग्राउंण्ड वर येऊण मित्रांसोबत गप्पा मारत बसायच आणि संध्याकाळी घरी जायच अस रुटीन चाल्ल होत त्याच ....
असच एक दीवस दुपारचे साधारण २-२:३०  वाजले असतिल फेबृवारी महिना असल्यामुळे
ऊन जरा जास्तच आपली ताकद पणाला लावत होतं...मैदानात एका कोपर्यात ४-५ झाडांची छान सावली पडली होती. तेथे तो व त्याचे काही मित्र जाऊन पोहचले व गप्पा मारु लागले...
खर तर आज त्याला घरी जाऊण अभ्यास करायचा होता पण तो शंकर चि वाट पहात तेथे मित्रांसोबत वेळ घालवत होता ...शंकर तसा दुसर्या कॉलेज ला होता पण त्याचा एक्झाम नं. ह्या कॉलेज ला लागला होता तेव्हा शंकर त्याच्या रीसीट वर प्राचार्यांचि स्वाक्षरी घेण्यासाठी येनार होता ....
तो मित्रांसोबत गप्पा मारत बसला असताना त्याच लक्ष एका मुलींच्या ग्रुप कडॆ गेल,
त्यातली एक मुलगी त्याचकडॆ पहात होती...
२ मि त्याला कळायला वेळ लागला कि कोण ही ? पण त्याणे तीला ओळखले...होय
सोनल ,,,सोनलच ती दुसरी कोणी असुच शकत नाही ..
त्याला क्षणभर स्वताच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही...अचानक त्याची ह्रुदयाची धड्धड वाढली , हाता पायांना घाम फ़ुटला
कधी हरवलेले प्रेम पुन्हा भेटले आहे का तुम्हाला? काय अवस्था होती त्यावेळेस तुमची? बोलण्यासाठी शब्दही नसतात..
त्याला आता या क्षणाला काय कारावे काही काही सुचत नव्हते ......तो स्तब्ध नजरेने फक्त तिच्याकडे पहात होता ..
वर्याचि एक निखळ झुळुक अंगाला स्पर्श करुन जाते आणि तो स्पर्श मनाला ही होतो . मग मनही उडु लागत वार्या बरोबर आणि घेऊण जात पुर्विच्या जगात ...
हो ते जग पुर्विच कधी झाल कळलच नाही ..
सरला बराच काळ , बदलल्या बर्याच गोष्टी
पण तरिही त्या सुखद आठवणींच्या सुखलेल्या पाकळ्या मनाच्या पुस्तकात कुठेतरी दडऊन ठेवल्या होत्या ..त्या आत एका क्षनात त्याच्या मेंदुपटलावर उमटु लागल्या ...
त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद दिसत होता ....पण हा कसला आनंद ? तिला खुप दिवसांनी पाहिल याचा की आपल काहितरी हरवल होत आणि ते खुप दिवसांनी मिळाल याचा .
पण जर हरवलच होत तर त्याणे ते का हरु दिल होत.... पण खरतर
काही गोष्टी  त्यावेळीस हळुच सोडुण द्याव्या लागतात .
आपण कितिही प्रयत्नांचि पराकष्टा केली तरी निदान त्या वेळीस तरी त्या आपल्याला आपल्या करता येत नाही ..
पण गमत म्हंणजे नंतर ति गोष्ट आपल्याला
कुठेतरी नकळत मीळुन  जाते ..तेव्हा ति गोष्ट मिळाल्याचा आनंद काही औरच असतो ..
अगदी तसाच आनंद त्याला आता या क्षणी झाला होता ...
पण त्याला या परीस्थीतीत नेमक काय कराव कसं वागव काही काही सुचत नव्हते....

हे सर्व चालु असताना त्याला मागुण कोणीतरी त्याचा खांदा धरुन हलवल्यासारख झाल ..
तो क्षणात या सर्वातुन बाहेर आला ..मागे वळुन पाहु लागला कोण आहे ते ...
शंकर त्याचाच जिवळग मित्र ..
त्यांच्या मैत्रीला जास्त जुणी ओळख नाही म्हणता एणार मागच्याच वर्षी त्याची आणि शंकर ची ओळख झालेली ति सुद्धा तो hostel मध्ये रहात होता तेव्हा.
ते एका क्लासमध्येही नव्हते किंवा एका कॉलेज मध्ये ही नव्हते ... पण म्हणता ना जिवाला जिव देनारी माणसे कधी ,कुठे भेटतिल सांगाता येत नाहीत तसच काहीस ....
त्याच्या मनात एखादी गोष्ट चालु आहे आणि ति शंकर ला माहिती नाही अस कधी होतच नसे....
तसच ह्या सोनल बद्दल सुद्धा ..
तो जेव्हा शुन्यात कुठेतरी सोनल कडे पहात होता तेव्हाच शंकर ने ओळखल होत ही कोन  असावी ...त्यामुळे त्याला शंकर ला काही जास्त सांगण्याचि गरज नाही भासली.
ति आजुअही त्याला पहात होती ..
पण त्याला आता काय कारवे सुचत नव्हते
पण शंकर आल्या मुळे त्याला आता जरा हायसे वाटले होते ...
शंकर ने त्याची हि चल बिचल ओळखलि
शेवटी शंकर नेच पुठाकार घेउन चल तिच्याकडे असे म्हटले ....
आता काही जास्त ओढेतावे न घेता तो ही शंकर बरोबर तिच्या दिशेने चालु लागला होता..
तिची नजर त्याच्यावरच खिळली होती आणि आता तो ही चालता चालता तिच्या नजरेला नजर भिडवत चालत होता...मनातल्या असंख्या प्रश्नचि किवा उत्तरांची जुळवा जुळव करत ...... ..
ति पण त्याच्या डोळ्यात पहात होती .
पण कोणत्या नजरेणे !
खरच का तिने त्याच्या डोळ्यातला पवित्र अन् मंगल भाव जाणला होता ?
अस म्हणतात कि स्त्रि ला इश्वराने एक अशी शक्ति दिलेली असते कि ज्यावरुन ति पुरुषाच्या एका नजरेतुन त्याच्या मनातिल भाव ओळखु शकते .
पण खरच का तिणे त्याची नजर ओलखली असेल त्याच मण जानल असेल .
या विचारंच्या चक्रात असतानाच तो आणि शंकर कधी  तिच्याजवळ पोहचले कळलच नाही...ति सुद्धा आता तिचा गृप सोडुन जरा बाजुला आली होती ..

तो , त्याच्या थोडा मागे शंकर त्याच्याच बाजुला आणि सोनल एक - दोन हाताचे अंतर ठेउण पुढे उभी होती..
कोनतेतरी  प्रक्टीकल संपल्यामुले ग्राउंडवर आता बरेच मुले-मुलि जमले होते ..
मघाशी शांत असलेल्या मैदानाने आता
गडबड आणि गोंधळाची जागा घेतली होती ..
त्याची तर अवस्था एखाद्या पुतळ्यासारखी झाली होती......मघाशी तिला एक टक पहानारे डोळे आता उगाचच ईकडे तिकडे भिरभिरत होते ....अंगाचा तिला न जानवनारा सुश्म असा थरकाप चालला होता ......घामाने ओला झालेला हात ....गीळालेली थुंकी सुद्धा एखाद्या वाफे सारखी तोंडात विरुन जात होती ....
शेवटी तो कोणत्या परिस्थीतित आहे याची जानीव तीला  झाली असावी आणि तिने
शांत आणि गोड आवाजात प्रश्न केला
कसा आहेस ?
कसा आहेस ? या तिच्या प्रश्नाचे उत्तर आता नेमक काय द्यावे ...
कारण मगाशी काही क्षनापुर्वी तु दिसायच्या अगोदर तो खुप छान मजेत होतो,,,,,पण आता ती दिसल्यानंतर कसा असेल तो  ?

काही वेळ अशीच निगुन गेली ...त्याच्या तोंडातुन तर ब्र देखील निघत नव्हता ...काय बोलाव त्याला काही सुचत नव्हते,,,
शेवटी शंकर ला याची जानिव झाली असावी त्यानेच त्या शांततेचा भंग करत त्याला मागुन हालवत सांगितले " अय्य्य्य्य बोल ना ""
शेवटी त्याने स्वताला कसेबसे सावरत "ठीक आहे "... असे प्रतीउत्तर दिले...
इथे फ़क्त २ ते ३ मि .त्यांच संभाषण झाले असेल पण ह्या २ ते ३ मि. तो नेमक काय बोलला व ति काय बोलली हे तो आजुनही आठवत आहे ..

दुसर्या दिवशी तो आणि शंकर  सकाळीच कॉलेज ला निघाले ,आज १४ फेबृवारी हा दिवस होता मनातल्या मनात त्याने काहीतरी ठरवले होते...
तो तिची वाट पहात मैदानातच उभा होता,,
शेवटी ति आली आणि तो तिला सामोरे गेला....परत एकदा त्यांच्यात संभाषण सुरु झाले ...
ह्या वेळीस तो पुर्ण शुद्दिवर होता ति काय काय बोलत आहे तो काय उत्तर देत आहे हे त्याला पुर्ण समजत होते
खरच ति त्याला हे पुर्ण वर्ष त्याला ह्या कॉलेज मधे पहात होती....त्याला दिसला कि बोलवत होती पण याचे एकदाही तिच्याकडॆ लक्श गेले नाही..असे तिच्या बोलण्यातुन समोर आले.....

प्रक्टिकल्स संपले , आता एक्झाम सुरु झाल्या होत्या ...
दररोज कॉलेज ला जायच तिला पहायच आणि परिक्षेला बसायच.....खरच त्या पेपरात लक्ष लागल असेल का त्याच...
अखेर शेवटचा पेपर सुद्धा संपला ...मनात एक प्रकारची हुरहुर ..परत भेट होइल की नाही.काही काही माहीत नाही.
काय बोलावे काय करावे काही काही सुचत नव्हते...शेवटी ओल्या पापण्याने आणि
हसर्या चेहर्याने दोघांनी एक मेकांचा निरोप घेतला .......( तो शेवटचाच होता )
.
.
.
पुढच्याच महिन्यात त्याचा एक मित्र त्याच्याकडे एक लग्न पत्रिका घेउन आला....
त्यावर तिच्याच सुंदर हस्ताक्षराने लिहलेले नाव होते...
                      - तेजस चिमटे

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०१५

असच काहीतरी..

वेळ कूणासाठी थांबत नाही आणि आपणही आपल्या रत्यावर चालत राहतो, न थाबंता. त्या रत्यावर मग काही आपले भेटतात जे शेवटपर्यंत साथ देण्यास तयार असतात तर काही अर्ध्यावरच साथ सोडतात, पुढे वळणं येतात, चढ उतार येतात आणि विश्रांतीची जागाही येते. भूतकाळातले हिशेब मांडायला ही जागा चांगली. नूसतेच ऐहिक हिशेब नाहीत तर नात्यांचेही हिशेब.

वार्याची एक नीखळ झुळूक अंगाला स्पर्श करुन जाते, आणि तो स्पर्श मनालाही होतो.
मग मनही उडु लागतं वार्या बरोबर आणि घेऊन जातं पूर्वीच्या जगात.
हो, पूर्वीच्या जगात. ते जग पूर्वीच कधी झालं कळलच नाही.
सरला बराच काळ, बदलल्या बय्राच गोष्टी.
पण स्वतःला बदलण कधी जमलच नाही.

पण तरीही त्या गोड-कडू आठवणींच्या सूखलेल्या पाकळ्या मनाच्या पुस्तकात कुठतरी दडवून ठेवल्यात. का कुणास ठाऊक?

या आयुष्याच्या वाटेवर खुप माणसे भेटतात,
काही निघुणही जातात
" ज्याना जायच असत ते आपला ठाव ठिकाना सांगुण नाही जात
ज्याना परतुन यायच असत ते नेहमी आपली चाहुल सोडुन जातात ..
मागे उरतात त्या आठवणी...
काळानुरुप त्याही निघुण जातिल.."

अशाच काही आठवणींची , कडू-गोड स्वप्नांची ही शिदोरी " क्षण-क्षणाचे सोबती " या ब्लॉग मार्फत तुमच्या पुढ्यात...