वेळ कूणासाठी थांबत नाही आणि आपणही आपल्या रत्यावर चालत राहतो, न थाबंता. त्या रत्यावर मग काही आपले भेटतात जे शेवटपर्यंत साथ देण्यास तयार असतात तर काही अर्ध्यावरच साथ सोडतात, पुढे वळणं येतात, चढ उतार येतात आणि विश्रांतीची जागाही येते. भूतकाळातले हिशेब मांडायला ही जागा चांगली. नूसतेच ऐहिक हिशेब नाहीत तर नात्यांचेही हिशेब.
वार्याची एक नीखळ झुळूक अंगाला स्पर्श करुन जाते, आणि तो स्पर्श मनालाही होतो.
मग मनही उडु लागतं वार्या बरोबर आणि घेऊन जातं पूर्वीच्या जगात.
हो, पूर्वीच्या जगात. ते जग पूर्वीच कधी झालं कळलच नाही.
सरला बराच काळ, बदलल्या बय्राच गोष्टी.
पण स्वतःला बदलण कधी जमलच नाही.
पण तरीही त्या गोड-कडू आठवणींच्या सूखलेल्या पाकळ्या मनाच्या पुस्तकात कुठतरी दडवून ठेवल्यात. का कुणास ठाऊक?
या आयुष्याच्या वाटेवर खुप माणसे भेटतात,
काही निघुणही जातात
" ज्याना जायच असत ते आपला ठाव ठिकाना सांगुण नाही जात
ज्याना परतुन यायच असत ते नेहमी आपली चाहुल सोडुन जातात ..
मागे उरतात त्या आठवणी...
काळानुरुप त्याही निघुण जातिल.."
अशाच काही आठवणींची , कडू-गोड स्वप्नांची ही शिदोरी " क्षण-क्षणाचे सोबती " या ब्लॉग मार्फत तुमच्या पुढ्यात...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा