गुरुवार, ३० जून, २०१६

अनोळखी .... पण ओळखीचे

        दि . .२९ जुन २०१६   
       वेळ . . ०८ : ००



अनोळखी माणसाला सगळं सांगून टाकल्याचा फायदा असा असतो की आयुष्यात तो पुन्हा आपल्याला भेटणार नसतो, अनोळखी असल्याने एकमेकांविषयी काही मतं किंवा पूर्वग्रह नसतात. समोरचा माणूस आपल्याला जज करणार नाहीये ही भावना मन मोकळं करण्यासाठी किती आवश्यक आहे हे तेव्हा मला प्रकर्षाने जाणवून गेलं !! ओळखीच्यांसमोर आपली रडगाणी गाऊन आपल्या 'स्व' ला धक्का लावून घेण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी सोपा !!
     खुप अनोळखी माणसं मला बोलतात , कि तु तुझ्या मनातलं लगेच कसं सांगतोस किंवा लगेच असा कसा एखादयावर विश्वास ठेवतोस ...
खरं तर हिच माणसं मला ओळखीची आणि विश्वासातली वाटतात . काहीच घेणं - देणं नसतं अशा लोकांकडून कारण ऋणानुबंध जुडलेले नसतातच ना ?
त्यामुळे समोरच्याला ते पटतंय कि नाही याचा विचार मी नाही करत .मी माझ मन मोकळ करत असतो बस .
खर तर ओळखीच्या माणसांना सांगण्यापेक्षा हे खुप बरं असतं ... कारण की होत काय की ओळखीच्या माणसांना सांगायला गेल तर आपण जे सांगीतल आहे ते समोरच्या पर्यंत पोहचले की नाही याची भीती जास्त वाटते .
          खरतर माणसाला दुसऱ्याची दुःख जाणून घेण्यात आनंद वाटतो ... का वाटतो माहीत नाही ?
पण ठिकय त्या कारणाने का होईना समोरचा आपल्याला समजुण घेतोय हे महत्त्वाचे ..


चेहरे अजनबी हो जायें
           तो कोई बात नहीं,
                       रवैये अजनबी हो
                                 तो तकलीफ देते हैं  !!


गुरुवार, १७ मार्च, २०१६

काही विचार करायला लावणारं ...

* काही विचार करायला लावणारं ....

1.  ती - काही खाणार का ?
     मी - इथ माणंसच माणंसाला खातात मग माणुस काय  खाइल ..
      असो..थोड पाणी मिळाल तर बर होईल.

2 . जिंदगीकी दुवा ना दे जालीम ...
      जिंदगी किसको रास आइ है...

3 . दुसर्याची दु:ख जाणुन घेण्यात एवढा का आनंद असतो ?

4 . जीवनात एखाद विसाव्याच ठिकाण दुदैवान जर भेटल नाही..
      तर माणुस दुसर्या ठिकाणाचा आधार घेऊण जगायला लागतो..

5 . अंतररंगाचा विचार करण्याची वाट ,बाह्यारुपावरुनच जाते..

6 . तहानलला जीव आणि तहान भागवणारा जीव यांना लांबुन पहाणारा एक जीव लागतो . पण तोही कसा पाहीजे ? त्याला तहाणेची आर्त समतली पाहीजे आणि ती भागवणाऱ्याची क्षमताही ओळखीची हवी ..

7 . शोधायला गेल्यावर तेच सापडेल जे हरवले होते . पण जे बदलले आहे . ते सापडणे जरा अवघडच ...i

8 . समाधान मानूण घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही आणि पुष्कळदा स्वतःला सुखी समजणारी माणसं ही केवळ सवईने सुखी झालेले असतात ....

९ . वेदनेत , दुःख: त आणि प्रायश्चित्तात आनंद आहे आणि त्याच्यामुळेच आयुष्याला अर्थ आहे ...

१० . ज्या गोष्टींवर माणसाच प्रचंड प्रेम असतं , तिचाच त्याच्याकडुन नाश होतो .
  फरक फक्त एवढाच आहे की ,
कोणी प्रेम देऊन मारतं तर कोणी व्देश करूण मारतं .

११ . आयुष्य हे कठीण आहे , सगळ्यांनाच ते जगण्यासाठी लढा द्यावा लागतो .
पण आव्हानांना संधी म्हणून स्वीकारणारे काहीच लोक असतात ..

१२ . वियोगाच दुःख सहनशक्तीच्या पलीकडचं असतं
    वाट पाहण्याच्या यातना तर जीवघेण्या असतात .

१३ . शारीरिक सोंदर्य हे फक्त प्रारंभापुरतं निमित्त ठरतं
   प्रवासभर सोबत होते ' ती विचारांचीच ..

१४. सुखाची आणि दुःखाची कारणं शोधण्यापेक्षा समोरच दुःख आणि सुख जसच्या तसं स्वीकारण हेच आधिक चांगलं .

१५. दुःख मुके असते , हेच खरे ! ते दृष्टीतुन किंवा स्पर्शातुन सांगता येते , पण शब्दांतुन काही प्रकट करता येत नाही ...

१६ . ज्या दुःखाचे स्वरूप अजुन माझे मलाच नीट कळलेले नाही . ते दुसऱ्याला तरी कसे समजाऊन सांगायचे ...

१७ . शब्द तेच असतात , फक्त त्यांची सांगड ( रचना ) कोण कुठल्या प्रकारे घालतो यावर सारा खेळ अवलंबुन असतो .

१८ . जास्त काय लिहिणार ?
       जे राहून गेलं , ते राहणारच होतं ,
     कारण , काय करायच ? हे ठावणारा मी नव्हतो .
   आजही जे करावस वाटतं आहे , ते तरी हातून कुठं  होतय ? म्हणूनच , ' जो तुझे मंजुर, वो हमें मंजुर '
म्हणत वेचारीक पातळीवर शांत आहे ...

शेवटी ...
- क्षण- क्षणाचे सोबती ....